औरंगाबाद जिल्हा संपूर्ण माहिती | इतिहास | वैशिष्ट्ये

औरंगाबाद जिल्हा संपूर्ण माहिती | इतिहास | वैशिष्ट्ये

  औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती इतिहास आणि वैशिष्ट्ये आपण आजच्या या लेखांमध्ये बघणार आहोत. औरंगाबाद हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असून देश-विदेशातील  नागरिकांच्या आकर्षणाचा जिल्हा आहे औरंगाबाद जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये अनेक अशा सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आता औरंगाबाद जिल्ह्याचे संभाजीनगर हे नवीन नाव घोषित करण्यात आलेले आहे तसेच ते लागूही करण्यात आलेले आहे. म्हणजेच आता औरंगाबाद हे औरंगाबाद नसून संभाजीनगर आहे.

     


    औरंगाबाद जिल्हा संपूर्ण माहिती | इतिहास | वैशिष्ट्ये



    औरंगाबाद जिल्हा सीमा:


    दिशा सीमा
    उत्तरेस

     जळगाव जिल्हा


     पूर्वेस जालना जिल्हा
    पश्चिमेस व वायव्येस नाशिक जिल्हा
    आग्नेय बीड जिल्हा



    औरंगाबाद जिल्हा संपूर्ण माहिती:


     
    जिल्हा औरंगाबाद
     मुख्यालय औरंगाबाद
    क्षेत्रफळ 10,100 चौ.किमी
    तालुके(09) औरंगाबाद, पैठण ,कन्नड ,गंगापूर ,वैजापूर ,सिल्लोड ,खुलताबाद ,सोयगाव ,फुलंब्री

     नद्या गोदावरी ,शिवना, केळना,कौम,दुधना

    प्रमुख पिक बाजरी
     धरण जायकवाडी व नाथ सागर
    थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ
    अभयारण्य जायकवाडी पक्षी अभयारण्य गौताळा-औटरमघाट

    पंचायत समित्या 09
    ग्रामपंचायती 861

    जंगलांचे प्रमाण9.15%
    लोकसंख्या37,01,282

    .साक्षरता79.2%
    लिंग गुणोत्तर 924
    लोकसंख्येची घनता 370




    औरंगाबाद जिल्हा नकाशा

    औरंगाबाद जिल्हा संपूर्ण माहिती | इतिहास | वैशिष्ट्ये


    औरंगाबाद मधील प्रमुख नद्या:

    औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख नदी,
    • गोदावरी 
    • पूर्णा 
    • खाम 
    • यळगंगा 
    • शिवना 
    • अंजना 
    • दुधना 
    • खेळणा 
    • गिरजा 
    • वाघुर 
    औरंगाबाद जिल्ह्यातील धरणे:

    • पैठण येथील गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प,
    • कन्नड तालुक्यात गडदगड येथील शिवना नदीवरील धरण ,
    • खांब खेळणा व बोर नदीवरील धरण

    औरंगाबाद मधीलप्रमुख पिके

    बाजरी हे औरंगाबाद मधील प्रमुख पीक होय याशिवाय येथे ज्वारी गहू ऊस कडधान्य आणि भुईमूग याचे सुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते.

    औरंगाबाद मधील उद्योगधंदे:


    औरंगाबाद वाळूज चिकलठाणा पैठण येथे औद्योगिक वसाहती आहेत वाळूज येथे ऑटो निर्मिती व स्कूटर निर्मितीचा कारखाना आहे. बनवण्याचा कारखाना आहे व्हिडिओ उद्योग सुती कापडाच्या गिरणी आहे तसेच सहकारी साखर कारखाने सुद्धा आहे.

    • औरंगाबाद मधील वाळूज येथे बजाज ऑटो स्कूटर्स कंपनीचा कारखाना ,
    • जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी तसेच कोलगेट कंपनीचा कारखाना आहे
    • पैठण येथे हातमागं यंत्रमागावर जरीचे नक्षीकाम तसेच पैठणी साडी हिमृषाली, महारू किंवा किनखांबी पैठणी तयार करण्याचा उद्योग चालतो. 
    • सर्वसाधारणपणे पैठणची पैठणी देशातच नव्हे तर जगभरात सुद्धा प्रसिद्ध आहे. गुजराती फेटांसाठी सुद्धा पैठण खूप प्रसिद्ध आहे.
    • औरंगाबाद मधील चितगाव येथे व्हिडिओकॉन कंपनी रेफ्रिजरेटर तसेच वॉशिंग मशीन तयार करण्याचा कारखाना आहे.

    औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यांची नावे:

    ( Aurangabad Taluka List )

    औरंगाबाद जिल्हयामध्ये एकूण ९ तालुके येतात , त्या सर्व तालुक्यांची नावे खालील प्रमाणे आहे  

    • औरंगाबाद
    •  गंगापुर
    •  पैठण 
    •  फुलंब्री 
    • खुलताबाद 
    • सोयेगांव 
    • सिल्लोड 
    • कन्नड 
    • वैजापुर


    औरंगाबाद मधील पर्यटन स्थळे :

    ( Places to visit in Aurangabad )

    औरंगाबाद जिल्हा संपूर्ण माहिती | इतिहास | वैशिष्ट्ये


    • बीबी का मकबरा ( Bibi ka Makbara)
    • दौलताबाद किल्ला ( Daulatabad Fort)
    • एलोरा लेणी ( Ellora Caves)
    • औरंगाबाद लेणी ( Aurangabad Fort)

    Near by Places From Aurangabad

    • घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग ( Ghrushneshwar Jyotirling)
    • पेटल खोरा लेणी ( Petalkhora caves)
    • सिद्धार्थ गार्डन प्राणी संग्रहालय ( Sidharth Garden )
    • सोनेरी महल (Golden Fort)
    • शिवाजी महाराज संग्रहालय ( Shivaji Maharaj Muzium)
    • खुलताबाद येथील भद्रा मारोती


    औरंगाबाद जिल्ह्याची वैशिष्ट्ये - इतिहास:


    • मध्ययुगीन कालखंडामध्ये औरंगाबाद मध्ये यादवांची सत्ता होती.
    • औरंगाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव खडकी असे होते.
    • औरंगाबाद शहराची स्थापना मलिक अंबर यांनी 1604  मध्ये केली.
    • 1626 मध्ये या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले गेले तर 1653 मध्ये औरंगजेबने त्याचे नाव बदलून औरंगाबाद असे केले.
    •  आता पुन्हा औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर असे ठेवण्यात आले आहे. 

    • औरंगाबाद हे शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते.
    • येथील बीबी का मकबरा हा खूप प्रसिद्ध आहे ही वास्तू औरंगजेबाच्या मुलाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधली होती.
    •  या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजेच ही वास्तू आग्रा येथील ताजमहालाचे साम्य असणारी आहे.
    • औरंगाबाद शहरांमध्ये पानचक्की आहे.
    • या शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असून याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ उच्च व माध्यमिक शिक्षण मंडळ ,वाल्मिकी संस्था, सिद्धार्थ उद्यान ,प्राणी संग्रहालय, विमानतळ अशी अनेक स्थळे या शहरांमध्ये येतात.

    • औरंगाबाद मधील चिखलठाणा येथे विमानतळ आहे

    समारोप

    प्रामुख्याने औरंगाबाद एक ऐतिहासिक आणि विकसनशील जिल्हा आहे.  या जिल्ह्याची वेगाने वाटचाल सुरू आहे. येथे अनेक औद्योगिक वसाहती तयार होत आहे. तसेच अनेक कंपन्या सुद्धा येथे येत आहेत. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ची संपूर्ण माहिती इतिहास आणि वैशिष्ट्ये तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका व बाकीचेही आर्टिकल नक्की वाचा. all-in-marathi123 नक्की भेट द्या.


    जय मराठी |
    जय महाराष्ट्र|
     धन्यवाद|

    FAQs:

    1)औरंगाबाद मध्ये काय प्रसिद्ध आहे?
    Ans:अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बीबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय याच जिल्ह्यात आहेत.


    2)औरंगाबाद शहराची लोकसंख्या किती आहे?
    Ans:औरंगाबाद शहराची लोकसंख्या 37,01,282 आहे.


    3)महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
    Ans:औरंगाबाद शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते.


    4)महाराष्ट्राची दुसरी राजधानी कोणती आहे?
    Ans:नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी आहे.


    5)औरंगाबादला सर्वाधिक पर्यटक का येतात?
    Ans: होय, कारण औरंगाबाद शहर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते.


    टिप्पणी पोस्ट करा

    0 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.